Type Here to Get Search Results !

Sangli News : अगवर कळ सड आण हतत सप! सगलत अवतरल भतच आई 'तडकडतई'

<p style="text-align: justify;"><strong>Sangli Local News Updates :</strong> तडकडताई भुताची आई म्हणत आजपासून सांगलीत तडकडताईच्या खेळांना सुरुवात झाली. सांगलीकर नागरिकांची आवडती आणि लाडकी असणारी तडकडताईने आजपासून सांगलीत आपल्या खेळांना सुरवात केली. जेष्ठ आषाढ अमावस्येला तडकडताईच्या खेळांना सुरवात होते. &nbsp;आज सांगलीतील सिद्धार्थ परिसरात दिवा काढण्यात आला आणि तडकडताईच्या खेळालासुरवात झाली. पुढील आठ दिवस ही तडकडताई सांगलीत गल्लीबोळात फिरून अबाल वृद्धाना सुपाने मारत असते. तडकडताईचा मुखवटा हा भूतासारखा दिसतो. त्यामुळे तिला सगळी ताडजडताई भुताची आई म्हणून संबोधतात. आज तडकडताईला पाहण्यासाठी सिद्धार्थ परिसर, गावभागात आबालवृद्धांची मोठी गर्दी पहायला मिळाली.</p> <p style="text-align: justify;">सांगली शहराच्या गल्लोगल्लीत लहान मुलांवर दहशत आणि पळण्याची लगबग पसरलीय भुताची आई असलेली तडकडताई मुळे.. जेष्ठ महिन्यात आषाडीच्या अमावास्येला दैत्याचा संहार करण्यासाठी म्हैशासुर मरर्दीनी तड्कड ताईचा वेश घेऊन शहराची रखवाली करण्यासाठी फिरत असते. &nbsp;अंगावर साडी, तोंडावर काळा मुखवटा, हातात सूप घेऊन सांगली शहरात धावणारी हि आहे तडडताई. &nbsp;जेष्ठ महिन्यात अमावस्येला सांगलीत भावई यात्रेत जोगण्या उत्सवाला सुरवात होते. तडकडताई, भुताची आई, असा गजर करत लहान मुले या तडकडीचे स्वागत करतात. कुंभार घराण्याकडे तडकडीचा हा मान असतो. ही परंपरा गेल्या 250 वर्षापासून सांगलीत सुरू आहे.. कर्नाटक मधील बदामी येथून 7 वाट्या मानव लोकांनी पळवून आणल्या होत्या. त्यातली वाटी एक सांगली, आष्टा, कासेगाव, पलूस, कवठेपिरान अश्या ठिकाणी आल्या आहेत. त्यावेळी पासून ही प्रथा सुरू आहे.. दैत्य लोक त्यावेळी मानवाला त्रास करत होते, त्यावेळी चौडेश्वर देवी वाट्याच्या रुपात या गांवा मध्ये आली आणि मानवाच्या संरक्षण करण्यासाठी हा अवतार घेत असते. सांगली शहरात जोगण्या उत्सव हा जेष्ठ अमावास्येला संध्याकाळी 4 वाजता सुरु होतो. काळी साडी हातात सूप आणी चेहर्याला तडकडीचा मुखवटा अशा वेशात तड्कड ताईच्या लग्नाची वरात काढण्यात येते. कुंभारखिंड, सांभारे गणपती, सिटी हायस्कूल मार्गे थेट स्मशानात संध्याकाळी ६ वाजता या तडकडताई च्या लग्नासाठी शेकडो आबालवृद्ध हजार असतात, सूर्य अस्ताला जात असताना गव्हाच्या अक्षताने तिचा विवाह पार पडतो. विवाह पार पडल्यानंतर खोड्या करणाऱ्या बालकांना आपल्या हातातील सुपाने प्रसाद देते. या सुपाचा मार बसला की मुलांवरील इडा पिडा टळते अशी आख्यायिका आहे. अमावस्येचा हा कार्यक्रम पार पडल्यानंतर आषाढातल्या पौर्णिमेपर्यंत शहरातील ठराविक भागात जाऊन ती जोगवा मागते. तडकड ताईचा दरारा हा खूप मोठा असतो. अनेक लहान मुलेच नाहीत तर मोठी मुलेही या तड्कडताई ला प्रचंड घाबरतात. संस्थान काळापासून सुरु असलेली हि परंपरा आता 21 व्या शतकातहि जपली जात आहे.&nbsp;</p>

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.