रद्द झालेल्या महाभरतीचं परीक्षा शुल्क परत करण्याचं काम सुरू,परीक्षार्थींना मिळणार केवळ 65 टक्के फी परत...
![]() |
2019 मध्ये ही परीक्षा घेण्यासाठी एका खासगी कंपनीची नेमणूक करण्यात आली होती. त्यासाठी 33 कोटी रुपये परीक्षा फी म्हणून कंपनीनं विद्यार्थ्यांकडून वसूल करण्यात आले होते. मात्र कंपनी बोगस असल्याचं समोर आल्यानं त्यावर गुन्हा दाखल करून परीक्षा रद्द करण्यात आली होती.
अश्याप्रकारे मिळणार परीक्षार्थीना परीक्षा फी परत
• या भरती प्रक्रियेत सहभागी एकुण जिल्हा परिषद-34
• राज्यातील परीक्षार्थींचे जमा झालेले एकुण शुल्क- 33 कोटी 39 लाख 45 हजार 250 रुपये
• राज्यातील जिल्हा परिषदकडे पहिल्या टप्प्यात वर्ग केलेलं शुल्क- 21 कोटी 70 लाख 64 हजार 413 रुपये
• परीक्षा केव्हा होणार हे अद्याप स्पष्ट नाही ऑगस्ट 2021 मध्ये महाभरती प्रक्रिया सुरू केली होती. या दोन्ही जाहिरातीनुसार पात्र उमेदवारांनी यासाठी परीक्षा शुल्कासह उमेदवारी अर्ज दाखल केले होते. परंतु, पुढे ही भरती प्रक्रिया वादग्रस्त ठरल्याने ही महाभरती रद्द केली होती. भरती प्रक्रिया रद्द झाल्याने, यासाठी भरलेले परीक्षा शुल्क परत करण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली होती.
• राज्यातील परीक्षार्थींचे जमा झालेले एकुण शुल्क- 33 कोटी 39 लाख 45 हजार 250 रुपये
• राज्यातील जिल्हा परिषदकडे पहिल्या टप्प्यात वर्ग केलेलं शुल्क- 21 कोटी 70 लाख 64 हजार 413 रुपये
• परीक्षा केव्हा होणार हे अद्याप स्पष्ट नाही ऑगस्ट 2021 मध्ये महाभरती प्रक्रिया सुरू केली होती. या दोन्ही जाहिरातीनुसार पात्र उमेदवारांनी यासाठी परीक्षा शुल्कासह उमेदवारी अर्ज दाखल केले होते. परंतु, पुढे ही भरती प्रक्रिया वादग्रस्त ठरल्याने ही महाभरती रद्द केली होती. भरती प्रक्रिया रद्द झाल्याने, यासाठी भरलेले परीक्षा शुल्क परत करण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली होती.
राज्य सरकारने ही भरती प्रक्रिया करण्यासाठी एका खाजगी कंपनीची नियुक्ती केली होती. परंतु त्याऐवजी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस किंवा आयबीपीएस संस्थेमार्फत ही परीक्षा घेण्याचा निर्णय झाला. आयबीपीएस या संस्थेबरोबर जिल्हा परिषद स्तरावर सामंजस्य करार करून अर्ज स्वीकारण्याचे संकेतस्थळ विकसित करण्याची कारवाई करण्यात आली. मात्र अदयाप ही परीक्षा घेण्यात आली नाही. त्यामुळे ऑगस्ट 2022 ला अर्ज करणाऱ्या सर्व परीक्षार्थींचा जीव टांगणीला लागला आहे.